गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०१५

जय श्रीराम

एकदा एक म्हातारी होती. ती आपल्या झोपडीसमोर संध्याकाळी ७-८ वाजता, रस्त्यावरच्या tubelight च्या उजेडामध्ये काही तरी शोधत होती. हे सर्व एक मुलगा पहात होता. तो मुलगा तिला म्हणाला आजी काय हरवले आहे आणि कुठे हरवले ?आजी म्हणाली बाळ, सुई हरवली आहे माझ्या स्वयंपाघरात पडली.

मुलगा म्हणाला स्वयंपाघरात पडली मग इथे रस्त्यावर का शोधताय? आजी म्हणाली अरे, तिथे अंधार आहे. म्हणून इथे उजेडात शोधते ! आपले सगळ्यांचे असेच आहे. आपला आनंद कुठे हरवला आहे आणि आपण कुठे शोधतो आहोत ! किती जन्म आपण शोधले तरी अशा शोधण्याने तो मिळणार नाही. आत्मवस्तुचा आनंद आतमध्ये शोधायचा सोडून आपण विषयात शोधत आहोत. कसा बर मिळेल तो ?

नाम घेत राहिल्याने अन्तःकरण शांत होते आणि आत्मवस्तुचा अनुभव येतो.

जय श्रीराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc