काय आहे सियाचीन?
‘सिया’ म्हणजे गुलाब आणि ‘चीन’ म्हणजे घाटी म्हणजे घाटी अर्थात जिथे गुलाब फुलतात अशी जागा
सियाचीनमधलं तापमान उणे 50 अंशांपर्यंत खाली जातं, ज्यामुळे श्वास घेणंही कठीण
बेस कॅम्पपासून भारताची ‘इंद्रा कॉल’ नावाची चौकी सर्वात दूर, तिथे जाण्यास सैनिकांना 20 दिवस लागतात
‘इंद्रा कॉल’ चौकीकडे जाणारे सैनिक एकापाठोपाठ चालतात, त्यांनी एकमेकांना दोरखंडाने बांधलेलं असतं
ऑक्सिजनची कमतरता असल्याने फक्त बर्फाचे डोंगर, ना झाड, ना जनावरं, ना पक्षांचं वास्तव्य
बर्फावर सूर्याची किरणं पडली तर त्याचं प्रतिबिंब डोळ्यावर पडून दृष्टी कायमची जाण्याची भीती
थंडीपासून बचावासाठी सैनिक बरेच गरम कपडे वापरतात, तसंच तंबूत उष्णता राहावी म्हणून शेगडी ठेवतात
लाकडी फळीवर सैनिक स्लीपिंग बॅगमध्ये झोपतात, पण ऑक्सिजन नसल्याने झोपेतही मृत्यूचं प्रमाण जास्त
आंघोळ आणि दाढी करण्यास मनाई, कारण थंडीमुळे त्वचा नाजूक होते आणि जखमही भरुन येत नाही
एक सैनिक जास्तीत जास्त 3 महिने सियाचीनमध्ये राहतो, त्याच्या हालचालींवर बंधनं असतात
सियाचीनमध्ये फक्त ‘चिता’ नावाचं हेलिकॉप्टर उतरु शकतं, 19 हजार फुटांवर काम करण्याची क्षमता असलेलं एकमेव वाहन
‘चिता’ हेलिकॉप्टर 30 सेकंदांपेक्षा जास्त काळ ‘इंद्रा कॉल’ चौकीच्या हेलिपॅडवर थांबत नाही, कारण शत्रूचा धोका.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा