सध्या सर्वाधिक प्रखरतेने सूर्य आग ओकत असल्याने,
या दिवसांमध्ये दुपारच्यावेळी तळपत्या उन्हात बाहेर पडू नये. असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे..!
सूर्य पृथ्वीच्या मध्यावर, म्हणजेच विषुववृत्तावर येत असल्याने.. पृथ्वीवर त्याची सर्वाधिक ऊर्जा पोहोचत आहे.
या क्षेत्रातील अभ्यासकांनी, सूर्यापासून आपला बचाव करण्यासाठी.. दुपारच्यावेळी कुणीही घराबाहेर पडू नये, असा सल्ला दिला आहे..!
येत्या ४-५ दिवस सूर्य अगदी डोक्यावर येणार आहे..!
यालाच ‘इक्विनॉक्स फिनॉमिना’ असे म्हणण्यात येते.
त्यामुळे, भारतीय उपखंडातील दुपारचे तापमान, ४० डिग्री आणि त्याच्याही वरपर्यंत जाऊ शकते..!
कडक ऊन असल्याने, उष्माघाताचा झटका येण्याची शक्यता वाढते.
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने मृत्यू ओढावण्याचीही शक्यता आहे.
अतिनील किरणांचाही सर्वाधिक त्रास या काळात होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे,
'पाणी जास्तीत जास्त पिण्याचा' सल्ला देण्यात येत आहे..!
या दिवसात डोळे येण्याचे प्रमाण वाढेल.
ज्यांना ह्रदयविकाराचा तसेच डायबेटीजचा त्रास आहे, त्यांनी व्यवस्थित चेक-अप करत राहावे.. असाही सल्ला देण्यात आला आहे..!
आहारामध्येही, रसदार फळांचा वापर करावा. तसेच.. मांसाहार कदापिही करु नये..!!
आपली व आपल्या प्रियजनांची, काळजी घ्या..!
🌞🌞🌞🌞🌞🌞
उष्माघात...]>👇👇
🌞🌞🌞
उन्हामुळे मृत्यू का होतो?
दिल्लीपासून आंध्रापर्यंत...
शेकडो लोक उष्माघाताने मरत आहेत.
आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो?
👉 आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात
👉 घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक आहे.
👉 पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं
👉 जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कूलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं.
👉 शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं!)
👉 स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायूही निकामी होतात.
👉 रक्तातलं पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना (विशेषतः मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो.
👉 माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो.
👉 उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित रहावे, व आपल्या शरीराचे तापमान 37° अंशच कसे राहिल याकडे लक्ष द्यावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा