गुरुवार, १६ मार्च, २०१७

उठल्या उठल्या पोरटी स्वयंपाकघरात येऊन विचारतात , "आज डब्यात काय आहे"?

ऑफिसला जाताना अहो विचारतात ,"आज डब्यात परत दोड़का / वांगी / बटाटा /मटार/ फ्लॉवर नाही ना"?

शाळेतून घरी आल्या आल्या मुलांचा पहिला प्रश्न ,"आज लंचला काय आहे"?

संध्याकाळी भुक लागली की "चकली , नारळाच्या वड्या , लाडु , भडंग सोडुन काही आहे का?"

"डिनरला काहीतरी वेगळं आहे ना? की परत परवाच केलेली थालिपीठ, धीरडी , खिचड़ी किंवा आमटी भात पापड"?

"आज रविवार , काहीतरी "स्पेशल" करतेस का"?

बाकी कुठल्याही मानवी उत्क्रांति बद्दलच्या , क्लिष्ट व्याकरणातल्या , कठीण गणितातल्या, रासायनिक विघाटनातल्या, झालच तर भारताच्या प्रगती बद्दलच्या प्रश्नांनी मला इतकं बुचकळ्यात पडायला होत नाही , जितकं वरच्या प्रश्नांनी होतं ! 😙 चारीठाव नवनवीन पदार्थ करुन घालायला स्त्रियांमधली क्रिएटिविटी सतत कीती पणाला लागत असते नै !

पण आपल्या आज्या खरोखरी ग्रेट होत्या. या सगळ्या प्रश्नांना त्यांच्याकड़े एकच उत्तर होतं.
....
.....

"मेल्यांनो , मला खा आता"! 😁😀😀😀

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc