गुरुवार, १५ मार्च, २०१८

आजोबांचा शतकमहोत्सवी वाढदिवस होता . केक कापला . टाळ्या झाल्या . सगळं हॅपी हॅपी झालं . पण आजोबांच्या शतकाचं गूढ सगळ्यांना हवं होतं . आपल्या शहाण्णव वर्षांच्या सडपातळ पत्नीची अनुज्ञा घेऊन आजोबा सांगू लागले . माझ्या पंचविसाव्या वर्षी माझं लग्न झालं . लग्नानंतर आम्ही वेगळे राहू लागलो . आमच्यात तुमच्यासारखी भांडणे होऊ लागली . भांडणाला कंटाळून आम्ही एक निर्णय घेतला . ज्याची चूक असेल त्याने घराबाहेर पडायचे व पाच किमी चालून परत यायचे . तेंव्हापासून मी दररोज पाच किमी चालत आलो आहे . माझ्या उत्तम तब्येतीचे हेच गुपित आहे ! "अहो पण , आजी देखील स्लिम आणि ठणठणीत आहेत , त्याचे काय ? " "हे पहा ," आजोबा बोलले , " माझ्यावर विश्वास नसणे हेच तर भांडणाचे कारण असे . मी पाच किमी जातो की वाटेत हॉटेलात जातो हे पाहण्यासाठी ही सुद्धा माझ्या पाठोपाठ येत असे ! त्यामुळे हिचीही तब्येत ठणठणीत आहे !" 😁🙂😁🙂😁🙂😁🙂😁

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc